मेड इन पाकिस्तान

विकएन्डला स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता आणि तापमान १-२ च्या आसपास होत, म्हणून खरेदीसाठी बाहेर पडता आलं. गेली कित्येक दिवस मी माझ्या मापाची‌ ज्या विशिष्ट रंगातली खाकी शोधत होतो, ती‌ मला ५३ स्ट्रीट वरच्या ओल्ड-नेव्ही मधे मिळाली. भारतात शासकीय गणवेशाच्या रंगामुळे, खाकी रंगाच्या पॅन्ट आपल्या वापरात शक्यतो नसतात, पण अमेरिकेत रंगाचा तो संकेत नसल्याने खाकी इतर रंगसारखाच वापरला जाते. मी पॅन्ट पाहिली, आवडली, फिटींग रूममधे ट्राय केली .. आणि हो एकोणतीस डॉलरची , त्यादिवशी‌ सतरा डॉलरला होती, म्हणजे मी घेतल्यातच जमा !

मी चेकआऊट काऊंटरपाशी, अगोदरच्या व्यक्तीचं चेकआऊट होईपर्यंत उभा असताना, सहज लेबलकडे लक्ष गेलं – Made in Pakistan, लेबल वरच्या त्या तीन अक्षरांमुळं मी‌ परत माघारी‌ वळलो, पॅन्ट रॅकवर ठेऊन दिली आणि शांन्तपणे निघून आलो.

वरील घडालेला प्रसंग एका भारतीय सहकाऱ्याला सांगत असताना त्याने प्रतिक्रीया दिली,
” क्या साला, तू भी‌ ना, ऐसा सोचेगा तो इधर जीना मुश्किल हो जाएगा “,
मी‌ त्यावेळी‌ फक्त हसलो , मनात वाटत होत .. हो रे मित्रा, बरोबर आहे, असाच जर विचार केला तर जगणं मुश्किल होईल, इथंच नाही‌, पण भारतामधे !

माझ्या जागी तुम्ही‌ असता तर काय केलं असतं ?

मराठीभाषा :: गळचेपीची कारणं !

आपली भाषा अस्थिर होतेय, आपल्या भाषेला बाकिचे दुय्यम लेखतायत, आपल्या भाषेची (आणि भाषिकांचीही) गळचेपी होतेय .. असे एक ना अनेक सूर आज आपल्याला ऐकायला मिळतायत, कदाचित तुम्हीही हेच रडगाणं गात असाल. सांखिकीच्या, सामाजिक मान्सशास्त्राच्या, इतिहासाच्या किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय सत्य आहे हे पडताळण्याची गरज असेलही‌, पण एक मात्र नक्की … हे सगळे गळे मराठी बोलणारेच आहेत !
मनातल्या या शंकांवर काल विचार करत असताना एक माईंड मॅप तयार झाला. यातल्या ठळक कारणांवर नजर टाकता येईल :

मराठी

मराठी

१. भाषिक बाजारपेठ :
जिथे रिटर्न्स , तिथे इन्वेस्टमेंट, हा बदलत्या व्यावसायिक जगाचा पहिला नियम आहे. प्रत्येक उद्योजक त्याचं उत्पादन आणखी कसं विकल जाईल व नफा कसा वाढेल या प्रयत्नात असतो. उत्पादनविक्रीला जे काही‌ अडथळे येतात ते निपटण्याची‌ काळजी घेतली जाते .. मग तो अडथळा भाषेचा का असेना. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे युनिकोड अक्षरं पद्धती. विषेशत: युरोपीयन समुदायाचं युरो हे चलन अस्तित्वात आल्यानंतर एकाच वेळी अनेक भाषांमधे संगणन करण्याची प्रकर्षाने गरज भासू लागली व ही‌ समस्या सोडविण्यासाठी अनेक बलाढ्य कंपन्यांनी निधी उभा करून युनिकोड एककांची‌ निर्मिती‌ केली. यात भाषा आणि व्यावसायिकता यांचा मेळ घातला जात असताना महत्वाच्या गोष्टी‌ लक्षात येतात :

१. तेथील स्थानिक भाषांचा वापर – ‘उद्योजक ते उद्योजक (B-B)’ आणि ‘उद्योजक ते उपभोक्ता (B-C)’ या सर्व व्यवहारांमधे होतो.
२. ते काम त्या भाषेत करण्यावाचून अडलं होतं, व त्या अडवणूकीत कंपन्यांचं आर्थिक नुकसान होतं.
३. प्रकल्पातून मोबदल्याची शाश्वती

याच निकषावर आपण आत्मपरिक्षण केले तर पुढील प्रश्न उभे रहातात ..

१. संपुर्ण व्यवहारासाठी केवळ मराठीचा वापर करणारे B-B उद्योजक किती ?
२. किती , कोणत्या व्यवहारामधे मराठी-वाचून अडतय ? ( आपन अडून बसलो ? )
३. व्यावसायिक सेवांच्या मराठीकरणावर ‘रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट’ किती ?

आणि एक सत्य समोर येते, ते म्हणजे महाराष्ट्रातल सत्ताकारण आणि सहकारी साखर कारखाने याशिवाय असलेल्या व्यवहारी जगातली अर्थसत्ता मराठी भाषेवर अवलंबून नाही, त्यामुळे व्यवहारी जगात मराठी भाषा म्हणून कमी पडते.

२. शैक्षणिक अंधश्रद्धा :
भारतीय मनाला साहेबाच्या रंगाचं आणि बोलीचं भलतच कौतुक. इंग्रजीत बोलणं म्हणजे शहाण्या माणसाचं लक्षण, हा समज गेली दिडशे वर्षात ‘जनुकांमधे’ इतका भिनलाय की‌ आपण हाही विचार करायला विसरलो की – इंग्लंड/अमेरिकेतले वेडे इंग्रजीच बोलत असतील ना ?
केवळ इंग्रजी बोलणं वेगळं आणि स्वत:ची पंचैंद्रिय वापरून, त्याला तारतम्याची जोड देत विचारशक्तीला पणाला लावून कला-ज्ञान-विज्ञानच्या क्षेत्रात भराऱ्या मारणं वेगळं, याच भानच संपलय. याच गैरसमजातून निर्माण झालेली शैक्षणिक अंधश्रद्धा म्हणजे – इंग्रजी शाळांतून मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. याच अंधश्रद्धेपोटी कित्येक पालक खिशाला न परवडणाऱ्या शाळांमधे मुलांना घालतात. याविषयावर एक वेगळंच ब्रेन-स्टॉर्मिंग होईल, पण जाता जाता काही प्रश्न :

१. तुमची‌ मुलं ज्या शाळेत जातात ती शाळा एखाद्या राजकीय शिक्षण सम्राटाची तर नाही‌ ना ? त्यातले शिक्षक कोणत्या भाषेत शिकले ?
२. मराठी शाळेपेक्शा असं काय जास्त इंग्रजी शाळेत शिकवलं जाईल असं पालकांना वाटतं, जे त्यांना मुलाला शिकवता येणार नाही ?
३. आज देशविदेशात उच्चपदस्थ व्यक्तीची शालेय शिक्षण कोणत्या माध्यमात झाले ?
४. इंग्लंड अमेरिकेत नावाजलेल्या महर्षी स्कूल प्रमाणे भारतातल्या इंग्रजी शाळांत वैदीक गणित, संस्कृत शिकवतात का ? का नाही ?
५. आपला पाल्य (फक्त) इंग्रजी‌ बोलणारा पोपट करायचाय ?

३. भाषेचं राजकारण :
स्वातंत्र्यानंतर काही पक्षांनी त्यांच्या स्वातंत्यपूर्व इतिहासाचं भांडवल केलं आणि सत्ता मिळवली आणि उरलेल्यांनी सत्तेसाठी कारण शोधली.
अपवादात्मक चळवळी पक्ष सोडले तर इतर केवळ शंखच आणि यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे – भाषेचं राजकारण !

१. जर मराठी भाषा ‘वर्ल्ड क्लास’ झाली तर आत्ता भाषेसाठी राजकारण करणारे नंतर काय करतील ? त्यांना खरच असं व्हावं असं वाटत असेल का ?
२. एक पक्ष भाषेचं राजकारण करतो आणि दुसरा पक्ष पहिल्याला नामोहरम करतो .. यात भाषासमृद्धी कशी‌ होणार ?
३. पहिले दोने मुद्दे जर तुम्हाला पटत असतील तर त्याच्या अनुषंगाने खरच राजकारण आहे का ?

४. अ विज्ञान भाषा
आजच्या जगात वापरल्या जाणाऱ्या सर्व तंत्रज्ञानाचा शोध पाश्चिमात्य देशातला, मग विज असो, अवजड यंत्र असोत कि माहिती‌ तंत्रज्ञान, मोबाईल फोन. हे सर्व तिकडून आल्याने त्या भाषेतले शब्द मराठीत येणार हे उघड आहे. त्यासाठी नव-नविन शब्द योजले तर उत्तम पण त्यामुळे भाषेवर आक्रमण झाले वगैरे समज करून घेण्यात काही अर्थ नाही. कारण ‘योगाला’ ‘डिव्हाईन-जॉईन-स्ट्रेचेस’ असा शब्द मी कुठे पाहिला नाही, तो इंग्रजी (व इतर) भाषांनी आहे तसा स्विकारला. गुरू , अवतार, बुद्धा, मंत्रा, धान हे शब्द भारतीय भाषांमधून/संस्कृतीतून जशेच्या इंग्रजीमधे गेले, … हो पण एक नक्की आजच्या जगातल ज्ञान विज्ञान हे मूळातून मराठी भाषिकांनी मराठी भाषेत संशोधन करून निर्माण केलं नसल्याने , त्यातील शब्द आपल्या भाषेत आलेत, हे वास्तव स्विकारायला हवं

५. शिक्षण सम्राटांची धोरणं
विना अनुदान सुरू केलेल्या इंग्रजी शाळांमधे रग्गड पैसा मिळतो हे लक्षात आल्याने नियम #१ नुसार याची बेसुमार वाढ आहे. हेच होत असताना चांगल्या दर्जाच्या शाळा मराठी माध्यमातून सुरू करण्याकडे दुर्लक्ष.

मराठीभाषा :: प्रश्नांचा माईंडमॅप

मराठी दिनानिमित्त मनामधे जे काही‌ चाललं होतं त्याला आज बत्ती‌ लागली. बोलण्याच्या ओघात एकाने री ओढली‌ आणि राजकारण्यांमुळे मराठी भाषेचं कसं खच्चीकरण होतय यावर एक झकास भाषण दिलं. केवळ राजकारण हे कोणत्याही‌ भाषेच्या प्रगतीला जर कारण होऊ शकत नसेल तर ते अधोगतीलाही‌ नसले पाहिजे असं माझं मत आहे, .. त्या भाषेमधे जर अर्थकारण होत नसेल, तर राजकारण काय किंवा समाजकारण काय, कितीही मजबूत असले तरी‌ ती भाषा .. आणी तो समाजही‌ वाचू शकणार नाही. या विचारात भाषेच्या प्रश्नांचा एक माईंडमॅप तयार झाला, अर्थात हा अजूनही‌ अपूर्ण आहे ..

मराठी

मराठी

विद्यार्थी‌ आत्महत्त्या :: थोडे प्रश्न, थोडं चिंतन !

suicide

कितीही‌ नाही‌ म्हटलं तरी‌ आपण नक्कीच त्या टर्निंग पॉईन्टवर येऊन पोचलो आहोत, जिथल्या प्रॉब्लेम्सचं विवेचन ‘फ्रिजॉप काप्रां’नी‌ १९८२ मधे लिहिलेल्या ‘टर्निंग पॉईन्ट’ पुस्तकात आहे. काप्रा हे अमेरिकेतील प्रसिद्ध वैज्ञानिक आहेत, या पुस्तकात त्यांनी विज्ञान, समाज आणि उगवती‌ संस्कृती‌ आणि अर्थात उद्भवणारे प्रश्न यावर सुंदर विवेचन केलं आहे.

कळत-नकळत आज काळाने आपल्यालाही‌ तिथंच आणून सोडलय. सकाळी झोपेतून उठवणाऱ्या आलार्म पासून ते रात्री‌ झोप येण्यासाठी घेतलेल्या गोळ्यापर्यंत किंवा डास पळवण्यापर्यंत … आपल्या जगण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर, विचारांवर, समाजमनावर आणि संस्कृतीवरदेखील राज्य आहे केवळ टेक्नॉलॉजीचं ! आम्ही ग्लोबल आयटी‌ हब आहोत, हवी‌ असलेली‌ गॅजेटस् हाताशी‌ आहेत, आमच्या सेलला 3G नेटवर्क आहे, शे-दिडशे टिव्ही चॅनेल्स मनोरंजनासाठी आहेत, आमच्याकडे स्ट्रॉग आणि मुक्त मिडिया आहे .. , मला हे सगळ चांगलं कि वाईट या प्रश्नात पडयच नाहीय पण एक नक्की आम्ही-एक-समाज, काल जिथे होतो तिथून कुठेतरी‌ पुढे निश्चितच आलो आहोत यात काहीच शंका नाही.

पण हे सगळ होत असताना या ‘टर्निंग पॉईन्टला’ काप्रां आठवतात आणि प्रश्न पडतो आम्ही समाज म्हणून खरच सुखी‌ आहोत का ? समाजचं मानसिक संतुलन काय आहे ? आम्ही‌ जी‌ संस्कृती‌ जोपासतोय ती‌ उन्नतीकडे घेऊन जाणारी‌ आहे की अधोगतीकडे ? कारण ‘सो कॉल्ड’ या प्रगतीलादेखील दुसऱ्या बाजू आहेत ..सातबारा उतारे कॉम्युटरवर मिळतात पण ‘गांधीजीं’ शिवाय कॉम्प्युटर सुरू होत नाही‌, उपभोग्य वस्तू आहेत पण विज नाही‌. गावो-गाव नेटवर्क-कव्हरेज आहेत पण रस्ते, पिण्याचं पाणी, संडास नाहीत.. बौद्धिक संपदा आहे पण राजकारणाला त्यात स्वारस्य नाही‌.. आमचा सेन्सेक्स अप आहे पण शेतकरी‌ आत्महत्या करतोय, आम्ही उत्कृष्ठ शिक्षण देतोय पण .. आमचे विद्यार्थी जगायला घाबरतायत .. या आणि अशा अनेक, पण शेवटचा मात्र मनाला हुरहूर लाऊन जातो, कारण त्यात उद्याची‌ उज्वल आशा नाही‌, आहे केवळ स्मशान शांतता !

या आमच्या प्रगतीमधे आम्ही‌ अनेक बुरूज कमावतोय तसंच अनेक गमावतोय आणि त्यापैकी एक म्हणजे संवाद ! आमचा एकमेकांमधील संवाद संपत चाललाय, त्याची‌ जागा मृतवत ‘बोलण्याने’ घेतली आहे, कदाचित ‘व्यावसायिक बोलणं’ हा योग्य शब्द असेल. गेल्या महिनाभरातील घटनांवर विचार करताना त्या मुलांविषयी अनेक प्रश्न मनात आले, खरचं काय चाललं होतं त्यांच्या आतमधे ? कशाची भिती‌ वाटत होती‌ त्यांना ? पालकांशी संवादाने ते प्रश्न सुटले नसते का ? की पालकांचीच भिती‌ मृत्युपेक्षा जास्त होती‌ ? याच प्रश्नांचं स्वरूप आणखी‌ गंभीर होतं जेव्हा त्यांच्या शाळा आणि शिक्षक यांचा विचार मनात येतो, मिडियाने दिलेल्या बातम्यांनुसार ही‌ ‘विद्यार्थ्याची आत्महत्त्या’ होती‌, कुठेही ‘युवकाची किंवा कुमारांची’ हे शब्द दिसले नाहीत. आपल्या शिक्षणव्यवस्थेत शिकणारे विद्यार्थी‌ जर आत्महत्या करत असतील तर शिक्षणव्यवस्थेवरच शंका येते आणि प्रश्न पडतो “आम्ही‌ खरचं काय शिकवतोय त्यांना ?”

एकाच वेळी वर्गातल्या ६० मुलांकडे लक्ष देणं शिक्षकाला शक्य नाही हे मान्य आहे परंतु मुलांचं लक्ष्य आपल्याकडे येईल असा शिक्षक होणं हे तर शक्य आहे ना ? खरंच त्या शाळा-कॉलेजेसमधे असे एकही शिक्षक नव्हते, ज्यांच्याकडे त्या मुलांना विश्वासाने बोलता आलं नाही‌ ? ज्यांच्याकडे बघून ‘जीवन काय भन्नाट आहे’ असं वाटलं नाही ? असतीलही ..पण संवाद साधणं कमी झालय, हो ना ? हे प्रश्न घेऊन ब्रेनस्टॉर्मिंग करताना मी‌ शिक्षण-व्यवस्थेला किंवा त्या शिक्षकांना टार्गेट करत नाही तर हे टाळण्यासाठी संभाव्य आशास्थान म्हणून त्यांच्याकडे पहातो आहे. एकमेव आशास्थान ! इथे झालेल्या गोष्टींची चर्चा करून त्याचे दोषी‌ कोण हे शोधण्याइतकादेखील वेळ नाही, कारण टायमर चालू झालेला आहे .. काळ पुढच्या कोणाचीतरी तयारी करतोय, आणि प्रत्येकासाठी पालक म्हणून एकच प्रश्न उरतो – तुमच्या मुलांच्या मनात काय चाललय ?

हे सगळं वाचत असताना नकळत मला माझ्या आयुष्यातील सुसाईड-पॉईन्टला जाण्याचे प्रसंग आठवले. सगळं‌ अगदी नकोस वाटणं किंवा ‘आता आपलं सगळं संपलं’ या निर्णयाप्रत येणं ही‌ कोणाच्याही आयुष्यातील स्वाभाविक गोष्ट आहे. पण असं वाटत असताना कोणाचे शब्द तुमच्या कानावर येतात, कोणते चेहरे समोर दिसतात आणि तुम्ही‌ त्या क्षणी‌ काय करता हेच सर्वात महत्वाचं ठरतं. आणि इथेच मदतीला आले माझे शिक्षक! अशा प्रत्येक प्रसंगामधे मला तोडकर सरांनी‌ लिहिलेल्या एकमेव पत्राची‌ आठवण होते मी शांतपणे ते वाचून काढतो आणि जगण पुन्हा सुरू होतं. एखादा हायस्कूल शिक्षक विद्यार्थ्याच्या मनावर, विचार-भावना विश्वावर किती‌ परिणाम करू‌ शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे, या पत्रातील माझं नाव सोडलं तर उरलेला मजकूर .प्रत्येकसाठी‌ लागू‌ होतो, म्हणूनच हे पत्र इथे [लिन्क : http://blog.guruvision.in/?p=36 ] देतोय, कदाचित यातून काही शिक्षक, विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि पुढच्या अनेक आत्महत्त्या टाळता येतील.

आजारपण :: गांxx जळते तेव्हा !

प्रत्येक आजारपण काहितरी नविन शिकवतं, रोजच्या जगण्याकडे आपण नविन दृष्टीने पहातो,
गरजांचे प्राधान्यक्रम बदलतात, स्वत:चं नगण्यतत्व आणि घरातल्यांचं महत्त्व समजतं ..
आजारपणावर असं बरंच काही लिहिता येईल, ( दुर्गाबाईंनी‌ असं आजारी असतानाच ‘ऋतूचक्र’ पुस्तक लिहिलं म्हणे. )
आणि हो त्यानंतर एक नविन जगणं परत सुरू होतं, हेही‌ महत्त्वाचं.

जानेवारीच्या शेवटच्या दिड आठवड्यात आयोवामधल्या हिमवृष्टीनं कहर केला, त्याच वेळी शरिराने देखील हात वर केले. मानेच्या, डोक्याच्या प्रचंड वेदना, सर्दी‌, ताप आणि यात भर म्हणजे शौचावाटे रक्त आणि xxची आग ! हे सगळं होत असताना अनुभवनं हिही‌ एक वेगळी गंमत होती, कारण मी‌ घरात एकटा आणि बाहेर बर्फ, एकंदर माझी‌ एकाच वेळी‌ फाटली पण होती‌ आणि जळत सुद्धा !

आजारपणाचा ब्लॉग

आजारपणाचा ब्लॉग

** विदेशी डॉक्टरांचा उपाय झाल्यावर मी‌स्वत: देशी‌ उपाय सुरू केले, दोन आठवडे मी‌ ठिक आहे.